१ जून ते १५ ऑगस्टपर्यंत ७५ हजार पदांची भरती? कृती आराखडा तयार- Mega Bharti 2023 Updates

१ जून ते १५ ऑगस्टपर्यंत ७५ हजार पदांची भरती? कृती आराखडा तयार- Mega Bharti 2023 Updates

१ जून ते १५ ऑगस्टपर्यंत ७५ हजार पदांची भरती? कृती आराखडा तयार

राज्य शासनाच्या ४३ विभागांतर्गत पावणेतीन लाखांहून अधिक पदे रिक्त आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घोषणेनुसार आता १ जून १५ ऑगस्ट या अडीच महिन्यांत ७५ हजार पदांची भरती केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर आता कृती आराखडा शासनाने तयार केला असून १५ ऑगस्टपूर्वी जाहिराती प्रसिद्ध होणार, अशी माहिती सूत्रांनी दिली. राज्यात सत्ताबदलानंतर शिंदे फडणवीस सरकारने मेगाभरतीची घोषणा केली होती. कालबद्ध पद्धतीने १५ ऑगस्ट २०२३ पूर्वी भरती पूर्ण करण्याचेही जाहीर केले होते. २० ऑक्टोबर २०२२ रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट ब, क आणि गट- उ पदभरतीसाठी टीसीएस, आयबीपीएस या कंपन्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय झाला.

Mega Bharti 2023 in this Department

सध्या महसूल, कृषी, शालेय शिक्षण, ग्रामविकास, वैद्यकीय शिक्षण, सार्वजनिक आरोग्य व गृह, जलसंपदा (पाटबंधारे), महिला न बालकल्याण सामाजिक न्याय पशुसंवर्धन अशा महत्त्वपूर्ण विभागासह स्थानिक स्वराज्य संस्थामध्येही रिक्त पदे वाढली आहेत. करोनानंतर वित्त विभागाने पदभरतीवरील निर्बंध उठवल्याने पदभरतीस सच्या कोणतीही अडचण राहिलेली नाही. दुसरीकडे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांसह लोकसभा, विधानसभेच्या निवडणुका राजकीय सद्यःस्थिती राज्यात वाढलेल्या बेरोजगारीच्या पार्श्वभूमीवर सरकारता भरती करावीच लागणार आहे. त्याने भरतीचा कृती आराखडा युद्धपातळीवर तयार करण्यात आल्याचंही सूत्रांनी सांगितले.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

स्वातंत्र्यदिनापूर्वी ७५ हजार जागांची मेगाभरती – १ जून ते १५ ऑगस्टदरम्यान पदभरतीचे नियोजन

  1. राज्यात सत्तेवर आल्यानंतर दुसऱ्याच महिन्यात (ऑगस्ट २०२२) शिंदे फडणवीस सरकारने मेगाभरतीची घोषणा केली होती. कालबद्ध पद्धतीने १५ ऑगस्ट २०२३ पूर्वी भरती पूर्ण करण्याचेही जाहीर केले होते. २० ऑक्टोबर २०२२ रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट- ब, क आणि गट-ड पदभरतीसाठी टीसीएस, आयबीपीएस या कंपन्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय झाला, सच्या महसूल, कृषी, शालेय शिक्षण, ग्रामविकास, वैद्यकीय शिक्षण, सार्वजनिक आरोग्य व गृह, जलसंपदा (पाटबंधारे), महिला व बालकल्याण, सामाजिक न्याय, पशुसंवर्धन अशा महत्त्वपूर्ण विभागांसह स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही रिक्त पदे वाढली आहेत.
  2. दरम्यान, कोरोनानंतर वित्त विभागाने पदभरतीवरील निर्बंध उठवल्याने पदभरतीस सध्या कोणतीही अडवण राहिलेली नाही. दुसरीकडे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांसह लोकसभा, विधानसभेच्या निवडणुका, राजकीय सद्यःस्थिती, राज्यात वाढलेली बेरोजगारीच्या पार्श्वभूमीवर सरकारला मेगाभरती करावीच लागणार आहे. त्यादृष्टीने भरतीचा कृती आराखडा युद्धपातळीवर तपार करण्यात आल्याचेही सूत्रांनी सांगितले
  3. ३२ हजार शिक्षकांची भरती राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थासह खासगी अनुदानित शाळांमध्ये शिक्षकांची ६० हजार पदे रिक्त आहेत. या पार्श्वभूमीवर शिक्षकांची ३० ते ३२ हजार पदे ऑगस्ट २०२३पूर्वी भरली जातील. पुढच्या वर्षी उर्वरित ५० टक्के पदभरती होईल, असे शालेय शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले
  4. राज्य सरकारमार्फत गेल्या दोन-तीन वर्षापासून केवळ भरतीची घोषणा केली जात असून, आमच्या खेळ सुरू असल्याचे मत उमेदवारांनी व्यक्त केले सरकारमार्फत नोव्हेंबर २०२२ मध्ये ४ हजार तलाठी भरतीची घोषणा करण्यात आली होती परंतु, जाहिरात अद्याप आलेली नाही त्याचसोबत जानेवारीत वन विभागाच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली जाणार होती. परंतु मे उजाडला तरीही जाहिरात आलेली नाही.
  5. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यापूर्वीच मेगाभरतीच केली आहे १५ विविध पदे नियोजन सुरु आहे त्यासंदर्भात एकदा चर्चा करून भरतीचा प्रक्रिया लवकर सुरु करण्यासाठी प्राप्त असतील- सुधीर मुनगुंटीवार सांस्कृतिक कार्यमंत्री
  6.  राज्यात गेल्या काही वर्षांपासून पासून अनेक वेळा सत्ता परिवर्तन झाले; परंतु राज्यभरातील लाखो विद्यार्थ्यांची परिस्थिती जैसे थे आहे. भरतीचे केवळ गाजर दाखविण्याचे काम सत्ताधारी करीत आहेत. राज्य शासनाने लवकरात लवकर मेगाभरती घ्यावी.. महेश घरबुडे, कार्याध्यक्ष, स्पर्धा परीक्षा समन्वय समिती

 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

पहा येथे संपूर्ण माहिती

Leave a Comment