Gautami Patil news : पहा गौतमी पाटील काय म्हणाली “मी पाटीलच आहे आणि हेच नाव मी लावणार

Gautami Patil news : पहा गौतमी पाटील काय म्हणाली “मी पाटीलच आहे आणि हेच नाव मी लावणार

Gautami Patil News सबसे कातील गौतमी पाटील, असा आवाज देत संपूर्ण महाराष्ट्राला तिच्या नृत्याने व अदांनी वेड लावणारी व जागोजागी प्रत्येक कार्यक्रम हीट करणारी गोतमी पाटील (Gautami Patil Video) आता तिचा डान्स नव्हे तर तिच्या आडनावावरून ( Gautami Patil Surname) चर्चेत आहे. गौतमीच्या पाटील या आडनावावरून नव्या आंक वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. गौतमीमुळे पाटील आडनावाची बदनामी होत असल्यामुळे सुट तिने पाटील आडनाव वापरू नये, अशी मागणी एका संघटनेकडून करण्यात आली. तर मी पाटीलच आहे आणि हेच नाव मी वापरणार, असे चोख प्रत्युत्तर गौतमी पाटीलने दिले होते..

धुळे जिल्ह्यातील शिदखेडा या गावात गौतमी पाटील लहानाची मोठी झाली आहे. याच गावात तिचं बालपण गेलं. शिक्षण झालं. इथूनच नृत्यांगना म्हणून तिच्या करिअरची सुरुवात झाली… या गावात सध्या गौतमीचे मामा राहतात. पण तेही सध्या पुण्याला स्थायिक झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या घराला कुलूप लावण्यात आलेले आहेत. गौतमीच्या गावातील लोकांनी तिच्या आडनाववरून संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. तर काहींना कौतुक वाटत. ते गौतमीच्या ब्रेक कलेची कदर करत तिला दादही देत आहेत. पाटील आडनाव लावण्याबाबत अनेकांचे सडतोड उत्तर आहे.

Gautami Patil Mother: गौतमी पाटीलचे कुटुंब, आडनाव सध्या चर्चेत असतानाच इंस्टाग्रामवर गोतमीच्या बालपणीचा एक फोटो व्हायरल होत आहे.
गौतमीचं वाढलं बळ

कला आणि जात ही स्वतंत्र आहे. जातीशी कलेला जोडू नये, असे गौतमीच्या गावातील नागरिकांचं मत आहे. एकप्रकारे गोतमीच्या गावातील लोकांनी तिला समर्थनंच दिलं आहे. त्यामुळे गौतमीचं बळ वाढलं आहे.

तेव्हा कुठे होता समाज?

गौतमी पाटीलच्या आईची प्रकृती खालावली होती, तेव्हा समाज कुठे गेला होता? असा थेट सवाल शिंदखेडा येथील गावकऱ्यांनी केला आहे. आज गोतमी पाटीलचे नाव झालं आहे. ती प्रसिद्धीच्या झोतात आहे. त्यामुळे तिला समाजाकडूनच विरोध का होत आहे, असा प्रश्न आता गोतमीच्या गावकऱ्यानी उपस्थित केला आहे.

गौतमीच्या हलाखीच्या परिस्थितीत समाज कुठे गेला होता

गौतमी पाटील ही 96 कुळी मटाठा आहेत. ती पाटील घटातच जन्मली आहे. गौतमी पाटील यांची हलाखीची परिस्थिती असताना व त्यांची आईची प्रकृती खालावली असताना तेव्हा समाज कुठे गेला होता, असा सवाल मराठा क्रांती मोर्चाचि जिल्हा समन्वयक अरुण देसले यांनी उपस्थित केला आहे. गौतमी ही कलेच्या माध्यमातून पुढे जात आहे तर त्यांना केवळ पाटील नावारून विरोध केला जात आहे. प्रत्येकांची कला ही वेगवेगळी आहे. कला सादरीकरण करण हे प्रत्येकाचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे पाटील नावावरुन गौतमीला विरोध करणे हे चुकीच आहे. असेही अरुण देसले यांनी यावेळी सांगितले.

Leave a Comment